"वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।।
कपाळी लावतो महाराष्ट्राच्या
मातीला ।।
डोंगराशी भिडवतो छातीला ।।
तोड नाही जगात कुठे
आमच्या हिम्मतीला ।।
आम्ही रक्त पाजतो स्वतःचे
तलवारीच्या पातीला ।।
कारण पुजतो फक्त
।। " छत्रपती शिवरायांना " ।। —
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत.
मित्रानो ते झाल्यावरच कळत
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते
दोन शब्दात ती कधीच समजत नसते l.
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father.
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
मुलगा-(मुलाकडे येत)-मला तुला राखी बांधायची आहे. . मुलगा -मी बांधु देणार नाही.
मुलगी -पण का??
मुलगा- अरे वा उद्या मि मंगळसुत्र
घेऊन येईन घेशील का बांधुन.
रागवू नकोस मला मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,
आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,
एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही,
गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही,
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही कारण....
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर.
बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली
सोनेरी केस उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे.
स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!
तुझाच-बालाजी
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..