Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु...."
प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...
मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
'मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे'
ते पण जर तु होकार देणार असशील तर..
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.अजय इंगळे.
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही माझे parents allow अशा गोष्टींना करत नाहीत.. . मुलगा-हो का ? मला जस काय माझ्या बापाने all इंडिया पोरगी पटवा असोशिएशन चा चेअरमनच बनवलेय ना ...
जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.
रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...