तू लाजलिस
की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं
की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून
मीच,
काजळ हॊउन
ओठाखाली बसतो
तुझ्याकडे
पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
वाऱ्यावर
उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस
बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं
प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल
मनाला पुन्हा माझ्याशीच
तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो...!!!
Rab jane kyun koi ena yad aaunda hai, rab jane kyun koi ena tarfaunda hai, dil di dilagi v dekh lo yaro, oh jina tadfaunda hai sanu una pyar aaunda hai.
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं, प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं, प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...अजय इंगळे.
ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही माझे parents allow अशा गोष्टींना करत नाहीत.. . मुलगा-हो का ? मला जस काय माझ्या बापाने all इंडिया पोरगी पटवा असोशिएशन चा चेअरमनच बनवलेय ना ...
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!
समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि
छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...