साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो.... . . . साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस.. . . . कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे का ? प्रेयसी :- हो आवडेल ..... :-) तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट ... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ? प्रेयसी :- अकरा आहेत !! प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !! प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!! प्रियकर :- समोरच्या आरशात पाहून सांग 12 आहेत की नाहित...अजय इंगळे.
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
मुलगा-(मुलाकडे येत)-मला तुला राखी बांधायची आहे. . मुलगा -मी बांधु देणार नाही.
मुलगी -पण का??
मुलगा- अरे वा उद्या मि मंगळसुत्र
घेऊन येईन घेशील का बांधुन.
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या .
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का.??
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
तुझ हसन मी miss करतोय..
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...